Thursday, June 15, 2017

लोहगड किल्ला

लोहगड किल्ला



लोहगड हा किल्ला लोणावळ्याजवळ आहे सदर किल्ला हा  समुद्र सपाटीपासून ३४२० फुट उंचीवर आहे भारत सरकरने या किल्ल्याला दिनांक २६ मे, इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे.

तर चला जाणून घेयुयात आपण लोहगड बद्दल


                              


इतिहास : लोहगडावर सातवाहनचालुक्यराष्ट्रकूटयादव या सर्वांची राजवट राहिली आहे. सदर किल्ला हा अतिशय मजबूत, बुलंद आणि दुर्जेय आहे. किल्ल्यापासून जवळच असणारी भाजे आणि बेडसे ही बौद्धकालीन लेणी ज्या काळी निर्माण झाली, त्याही पूर्वी म्हणजेच इ.स.पू. सातशे वर्षांपूर्वी किल्ल्याची निर्मिती झालेली असावी.
      इ.स. १४८९ मध्ये मलिक अहमंदने निजामशाहीची स्थापना केली व स्थापनेनंतर  अनेक किल्ले जिंकले. लोहगड हा त्यापैकीच एक आहे.त्यानंतर इ.स. १६३० मध्ये हा किल्ला आदिलशाहीत आला. शिवाजी महाराजांनी १६५७ मध्ये कल्याण व भिवंडी परिसर जिंकला व लोहगड–विसापूर का किल्लाही आपल्या ताभ्यात घेतला 
       त्यानंतर इ.स. १६६५ मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहात हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन केला गेला. पुढे १३ मे १६७० मध्ये मराठ्यांनी पुन्हा एकदा  किल्ला परत जिंकला.
        पहिल्या सुरत लुटीच्या वेळेस आणलेली संपत्ती नेताजी पालकरने लोहगडावर आणून ठेवली होती. इ.स. १७१३मध्ये शाहूमहाराजांनी कृपावंत होऊन लोहगड कान्होजी आंग्रे यांस दिला. १७२० मध्ये आंग्र्‍यांकडून तो पेशव्यांकडे आला. १७७० मध्ये नाना फडणवीसांचा सरदार जावजी बोंबले याने तो आपल्या ताब्यात घेतला. नानांनी पुढे धोंडोपंत नित्सुरे यांच्याकडे किल्ल्याचा कारभार सोपवला. इ.स. १७८९ मध्ये नानांनी किल्ल्याचे बांधकाम आणखीन मजबूत करून घेतले. किल्ल्यात नानांनी सोळा कान असलेली एक बाव बांधली व तिच्या बाजूस एक शिलालेख कोरला, त्याचा अर्थ असा-शके १७११ मध्ये बाळाजी जनार्दन भानू – नाना फडणवीस यांनी ही बाव धोंडो बल्लाळ नित्सुरे यांच्या देखरेखीखाली बाजीचट याचेकडून बांधिवली. नानांनी आपले सर्व द्रव्य नित्सुर्‍यांचे निगराणीत लोहगडावर आणले. १८०० मध्ये नित्सुरे कैलासवासी झाले व नंतर १८०२ मध्ये त्यांच्या पत्‍नी किल्ल्यावर येऊन राहिल्या. १८०३ मध्ये किल्ला इंग्रजांनी घेतला. पण नंतर दुसर्‍या बाजीरावाने तो पुन्हा जिंकला. ४ मार्च १८१८ ला जनरल प्रॉथर लोहगड जिंकण्यासाठी आला. त्याने सर्व प्रथम विसापूर जिंकला. ज्या दिवशी विसापूर इंग्रजांनी घेतला त्याच्या दुसर्‍याच दिवशी मराठे लोहगड सोडून गेले.

पहाण्यासारखी ठिकाणे : 


१. गणेश दरवाजाः-  ह्या दरवाज्याचे वैशिष्ट्य म्हणजे दरवाज्याच्या उजव्या व डाव्या बुरुजाखाली सावळे कुटुंबाचा नरबळी देण्यात आला होता आणि त्याच्या बदल्यात त्यांच्या वंशजांना लोहगडवाडीची पाटिलकी देण्यात आली होती.येथे आतील बाजूस शिलालेख आहेत.
२. नारायण दरवाजाः-  नारायण दरवाजा हा नाना फडणवीसांनी बांधला होता. दरवाज्याजवळ एक भुयार आहे या भुयाराचा वापर हा भात व नाचणी साठवून ठेवण्यासाठी करण्यात येत असे.
३. हनुमान दरवाजाः- हा सर्वात जुना व प्राचीन दरवाजा आहे
४. महादरवाजाःहा गडाचा मुख्य दरवाजा असून या वरती हनुमानाची मूर्ती कोरली आहे. ह्याही दरवाज्यांचे काम नाना फडणीसांनी १ नोव्हेंबर १७९० ते ११ जून १७९४ या कालावधीत केले होते. 

          दरवाज्यातून आतमध्ये गेल्यावर एक दर्गा लागतो. दर्ग्याच्या शेजारी सदर व लोहारखान्याचे भग्र अवशेष आढळतात. दर्ग्याच्या बाहेर बांधकामासाठी लागणारा  चुना बनविण्याची घाणी आहे.उजवीकडे ध्वजस्तंभ आहे.धाज्स्थाम्बाच्या उजवीकडे चालत गेल्यास लक्ष्मी कोठी आहे.ध्वज्स्तंबा शेजारी काही शिवप्रेमींनी सिमेंटचा चौथरा बांधला असून त्या ठिकाणी तोफ आहे.दर्ग्याच्या पुढे थोडे उजवीकडे गेल्यास थोडा उंचवटयाचा भाग आहे. तेथे एक शिवमंदिर आहे. पुढे सरळ चालत गेल्यावर एक छोटेसे तळे आहे. हे तळे अष्टकोनी आकाराचे आसुन. त्याच्याच बाजूला पिण्याच्या पाण्याचे टाके देखील आहे. ही गडावरील पिण्याच्या पाण्याची एकमेव सोय आहे. तिथून पुढे पंधरा ते वीस मिनिटे चालत गेल्यास एक मोठे तळे आहे . नाना फडणवीसांनी या तळ्याची बांधणी केली आहे..मोठा तळ्याच्या पुढे  जातांना वाड्यांचे काही अवशेष दिसतात. गडावरून विंचवाच्या नांगीसारखा दिसणारा भाग म्हणजे विंचूकाटा , लक्ष्मी कोठीच्या पश्चिमेस विंचूकाटा आहे. हा विंचूकाटा म्हणजे पंधराशे मीटर लांब आणि तीस मीटर रुंद अशी ही डोंगराची सोंड आहे. विंचूकाटयावर जाण्यासाठी एक टप्पा उतरून पलीकडे जावे लागते . .या भागात पाण्याची उत्तम सोय आहे. गडाच्या आजूबाजूचा परिसर न्याहाळण्यासाठी या विंचूकाट्याचा उपयोग होत असावा.  विंचूकाट्याच्या खाली दाट जंगल आहे.गडावरून येतांना भाजे गावातील भाजे लेणी आवर्जून पहावीत.
        
         लोहगडाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे कड्याच्या टोकावर बांधलेली चिरेबंदी वाट. अशी रेखीव वाट फारच कमी गडावर पाहायला मिळते. लोहगडवाडी पार केली की ही सर्पाकार आकाराची वाट सुरू होते. एकदा का कोणीहि या वाटेने वर आला की मग तो माणूस वर येईपर्यंत पाहारेकर्‍यांच्या नजरेत राहत असे. तो व्यवस्थित हेरला जात असे . वाटेवर वेगवेगळे बुरूज आहेत. त्यावरून बाहेरून येणाऱ्या माणसावर नजर ठेवता येते. वाटेवर गणेश दरवाजा, दुसरा नारायण, तिसरा हनुमान आणि चौथा महादरवाजा असे चार दरवाजे आहेत. हनुमान दरवाजा जुना आहे. इतर तीन दरवाजे आणि एक उत्तम रेखीव जिना नाना फडणीस यांनी बांधून घेतला आहे. 

गडावर कसे पोहचल 

१.पुण्याहुन अथवा मुंबईहुन येत असाल तर लोणावळ्याच्या शेजारच्या मळवली स्थानकावर पॅसेंजर गाडीने किंवा लोकलने उतरावे. तेथून एक्सप्रेस हायवे पार करून भाजे गावातून थेट लोहगडला जाणारी वाट आहे . वाट मोठी आणि प्रशस्त असून.तिथून दीड तासांच्या चालीनंतर ‘गायमुख’ खिंडीत येऊन पोहचले कि खिंडीच्या अलीकडेच लोहगडवाडी गाव आहे. खिंडीतून उजवीकडे वळल्यास  लोहगडास आणि डावीकडे वळल्यास विसापूर किल्ल्यावर पोहचतो.

२. स्वतःचे वाहन असल्यास दुचाकी अथवा चारचाकी वाहनाने थेट लोहगडवाडीपर्यंत जाता येते. सदर रस्ता घाटाचा असून अत्यंत धोकादायक वळणे आहेत.

३.काळे कॉलनी ही पवना धरणाजवळ वसलेली आहे.तेथून लोहगड आणि विसापूर मधील गायमुख खिंड परिसर व्यवस्थित दिसतो.पवना धरणाच्या खालून एक रस्ता गायमुख खिंडीच्या डावीकडील टेक टेकडीवर जातो तेथून एक मळलेली पायवाट आपणास लोहगडवाडीत घेऊन जाते. या टेकडीवर अग्रवाल नावाच्या इसमाचा बंगला आहे. या वाटेने किल्ल्यावर जाण्यास २ तास लागतात. 

खाण्याची सोय: गडावरती आपण स्वतः जेवणाची सोय करावी अथवा लोहगडवाडी मध्ये जेवणाची सोय होऊ शकते. 
पाण्याची सोय:  शिवमंदिरा पासून पुढे एक तले आहे तळ्याच्या बाजूला पाण्याचे टाके आहे गडावरती पाणी पिण्यासाठी हि एकमेव सोय आहे.

राहण्याची सोय: गडावरती लक्ष्मी कोठी आहे. येथे रहाण्याची एकमेव सोय आहे. ३५ ते ४० जण येथे आरामात राहू शकतात




No comments:

Post a Comment

धन्यवाद

पुरंदर किल्ला

पुरंदर किल्ला सह्याद्रीच्या  दक्षिणोत्तर पसरलेल्या मूळ रांगेतून काही फाटे पूर्व दिशेकडे फुटले आहेत. त्यापैकी एका फाट्यावर  सिंहगड...